शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

कोकणातील मासळीवरील आयातबंदी गोवा सरकारने त्वरित उठवावी : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 17:26 IST

कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील मासळीवर गोवा राज्याने पूर्णत: बंदी घातली आहे. याबाबतचे निर्बंध हटवून ही बंदी गोवा राज्य सरकारने तत्काळ उठवावी, अशी मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी केली. 

ठळक मुद्देकोकणातील मासळीवरील आयातबंदी गोवा सरकारने त्वरित उठवावी : गिरीश बापटवाहनधारकांकडे अन्न भेसळचे प्रमाणपत्र आणि मासळी वाहतूक परवाना हवा, या निर्बंधांचा समावेश होता. 

 

सिंधुदुर्ग :  कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील मासळीवर गोवा राज्याने पूर्णत: बंदी घातली आहे. याबाबतचे निर्बंध हटवून ही बंदी गोवा राज्य सरकारने तत्काळ उठवावी, अशी मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी केली.  गोवा बंदीनंतर रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यांची झालेली मत्स्यकोंडी शासनस्तरावर सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी गुरुवारी मंत्रालयात मंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली समस्या सोडविण्यासाठी संबंधितांची बैठक झाली. 

काही दिवसांपूर्वी गोवा राज्यात दक्षिणेकडील राज्यातून आयात केलेल्या मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन आढळून आले. त्यामुळे ही मासळी खाणाºयांना विषबाधा झाली होती. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने तेथील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने कठोर उपाययोजना केल्या. गोवा राज्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातून आयात होणाºया मासळी वाहतुकीवर १ नोव्हेंबरपासून प्रथम काही निर्बंध आणले. त्यामध्ये मासळी इन्सुलेटेड वाहनांमधूनच गोव्यात आणावी तसेच वाहनधारकांकडे अन्न भेसळचे प्रमाणपत्र आणि मासळी वाहतूक परवाना हवा, या निर्बंधांचा समावेश होता. 

गोवा सरकारच्या या निर्बंधांना दोन्ही जिल्ह्यांमधून कडाडून विरोध झाला. गोव्याची वाहनेही या जिल्ह्यांमधून जातात. त्यामुळे गोवा सरकारला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मात्र गोवा सरकारने अन्य राज्यांतील मासळी गोव्यात आणण्यावर बंदी घातली. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना मत्स्यकोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले व कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे व होत आहे. पर्यायी मासळी बाजारपेठांचा शोध येथील मासळी व्यावसायिकांना घ्यावा लागत आहे. 

दरम्यान, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे मत्स्य वाहतूकदारांसाठी विशेष मोहीम राबवून परवाने देण्यात आले आहेत. या संदर्भात गुरुवारी मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांच्या दालनात एक बैठक घेण्यात आली. 

या बैठकीला गृहराज्यमंत्री तथा  सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, मत्स्य व्यवसाय आयुक्त विकास अरुण विधळे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त  पवार, कोकण विभागाचे सहआयुक्त देसाई उपस्थित होते. या बैठकीत गोवा राज्यात महाराष्ट्र राज्याचे शिष्टमंडळ जाऊन या संदर्भात तेथील अन्न व औषध प्रशासनास निवेदन दिले जाणार आहे. तसेच यासंदर्भात सर्व माहिती गोवा सरकारला दिली जाणार आहे. गोवा बंदी बेकायदा?मत्स्य व्यवसाय व वाहतुकीबाबत केंद्रीय कायद्यात गोवा सरकारने  घातलेल्या कोणत्याही निर्बंधांचा उल्लेख नाही. तशी कोणतीही तरतूद नसून फक्त तापमान नियंत्रणाची तरतूद आहे. अन्य राज्यांमधून गोव्यात मासळी आणण्यासाठी १० ते १५ तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे गोव्यापासून २ ते साडेतीन तासांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे ताजे मासे गोव्यात सहजपणे पोहोचतात. ही वस्तुस्थिती पाहता मासळी  वाहतुकीकरिता रत्नागिरी, सिंधुदुर्गवरील वातानुकूलित वाहनांबाबतचे हे निर्बंध त्वरित दूर करावेत, असे मत या बैठकीत मांडण्यात आले 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटsindhudurgसिंधुदुर्ग